नवरात्र महोत्सव



         श्रावण शुध्द त्रयोदशीस सकाळीच रेणुकेची पंचामृतादीने स्‍नान घालून विधीवत संपूर्ण पुजा केली जाते. हया दिवशी संपूर्ण अलंगार चढविल्‍या जाते. पीवळा पितांबर नेसविल्‍या जातो. भाळी मळवट भरुन शृंगारीत केल्‍या जाते व पुरण-पोळीचा नैवैद्य दाखऊन, मुखी तांबुल भरविला जातो व सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिल्‍या जातो. श्रावण समाप्‍तीस ‘ परंजण ’ असे म्‍हणतात. विशेष म्‍हणजे हया संपूर्ण श्रावण मासा मध्‍ये देवीचे वंशपरंपरागत सेवा करणारे मुख्‍य पुजारी अनुष्‍ठान करतात व हया कलावधीत सप्‍तशतीचे पठन नियमीत चालू असते.

         देवी महात्‍म्‍यात नवरात्राचे अनन्‍य साधारण महत्‍व आहे. हा नवरात्र उत्‍सव म्‍हणजेच आदीशक्‍तीच्‍या पराक्रमाचा – शौर्याचा, रणसंघराचा पवित्र काळ, सतत नऊ दिवस रणचंडीकेने दृष्‍ट राक्षसां सोबत घणघोर युध्‍द करुन, आपला पराक्रम दाखविला तो हा कालखंड, महिषासुर हया राक्षसा सोबत सतत नऊ दिवस युध्‍द करुन. त्‍याचा वध केला. तो हा कालखंड अश्विन शुध्‍द प्रतिपदेपासून देवीने हा पराक्रम करुन विजया दशमीस विजय संपादन करुन आई सिंहासनावर विराजमान झाली असा हा कालखंड हयाच कालखंडास शारदीय नवरात्र असेही म्‍हणतात. शारदीय नवरात्रोत्‍सव रेणुकेच्‍या गडावर अतिशय शुचिर्भुत वातावरणात, निस्सिम श्रध्‍देने साजरा केला जातो.

         अश्विन शुध्‍द प्रतिपदेला घटस्‍थापने ने हया मंगल पर्वास सुरवात होते. विधीवत पुजा-अर्चना करुन हया मंगल दिनी एका दगडाच्‍या कुंडा मध्‍ये मातृका भरुन त्‍यावर विवीध पाच प्रकारचे धान्‍य टाकल्‍या जाते. त्‍या कुंडावर मातीचाच कलश देऊन नागवेलीचे पान व श्रीफळ ठेवल्‍या जाते व त्‍या कुंडाच्‍या बाजूला पाच ऊस उभारुन पूष्‍पहार अर्पण केल्‍या जाते व प्रतिपदे पासून नवमी पर्यंत तेलाचे व तुपाचे अखंड नंदादीप तेवत ठेवल्‍या जाते. त्‍याच प्रमाणे प्रतिपदेस घटस्‍थापने पासून ते दस-या पर्यंत पायस म्‍हणजे दहीभात, पुरण-पोळीचा नैवेद्य नियमीत दाखविला जातो. घटस्‍थापने पासून चार दिवस पर्यंत गडावर रेणुका मंदीरा मध्‍ये संपूर्ण, विधीवत, यथासांग पुजा विधी नियमीत केल्‍या जातात.

         नवरात्रातील पंचमीस देवीचे मुखकमल अत्‍यंत आकर्षक आणि चित्‍तवेधक असते. हया दिवशी देवीची अलंकार पुजा केली जाते. महापुजा व महाआरती केल्‍या जाते व सर्व भावि‍क भक्‍तांना महाप्रसादाचा लाभ दिल्‍या जातो व सुर्यास्‍तापूर्वी देवीचे अलंकार उतरुन महाआरती केल्‍या जाते. नवरात्रातील सप्‍तमीस जवळील महाकालीच्‍या गडावर जाऊन महाकालीची यथासांग पुजा केली जाते व महाकालीस महावस्‍त्र अर्पंण केल्‍या जाते.

         आष्‍टमीस पहाटे विधीवत देवीची सर्व पुजा विधी झाल्‍या नंतर गुप्‍त अजाबळी दिला जातो व नंतर यज्ञास सुरवात होते. सप्‍तशतीचे पारायण केल्‍या जाते. होमा मध्‍ये समिधा टाकल्‍या जातात. दहीभात, धान्‍य, पाचवृक्षाची लाकडे, अदी होमा मध्‍ये अर्पण केल्‍या जातात. या पूर्वी नवग्रहाची पुजा केली जाते. सर्वच देव देवतांना अवाहन करुन यज्ञास सुरवात होते.

         नवमीस दिवसभर अष्‍टमी प्रमाणेच पुजा विधी केली जाते. नवमीचा यज्ञ होऊन नवार्ण मंत्राचा जप केल्‍या जातो व जप करुन यज्ञात पुरण-पोळीची आहुती दिली जाते व अजाबळी यज्ञ कुंडात दिला जातो नंतर महाआरती पुजा होऊन नवमी यज्ञाची सांगता होते.

         नवरात्रीच्‍या पूण्‍य काळात देवीच्‍या विविध रुपाच्‍या दर्शनाचा लाभ भाविकास होतो. हया काळा मध्‍ये रेणुकेच्‍या मुखकमलाचे दर्शन घेतांना विविध नऊ रुपे पहावयास मिळतात.

         ह्या शाकंभरी नवरात्राचे महत्व असे आहे की, जेव्हा भूतलावर महाभयंकर दुष्काळ पडला. पाण्या शिवाय जीव मात्रांना जगणे अशक्या झाले. तेव्हात ऋषी-मुनी-देव तपस्वी व भक्तांनी देवीची अराधना केली. तेव्हा प्रसन्नल होऊन देवी ने तिच्या शरीरा पासून वनस्पती म्हेणजे शाक निर्माण केली. ही वनस्प्ती विश्वातील जीवजंतूना दुष्काळा त अन्न म्ह्णून पुरवून त्यांना जगवीले. देवीने उत्प्न्‍न केलेल्या संजीवनी शाक वनस्पंतीमुळे जीवरक्षा झाल्या ने देवीस शाकंभरी म्हणून ओळखू लागले. असा शाकंभरी नवरात्रोत्स व दुर्गाष्टमी ह्या दिवशी प्रारंभ होतो. नित्य नियमाने संपूर्ण पुजा अर्चना झाल्या नंतर दही भाताचा नैवेध व पुरण पोळीचा नैवेध दाखवून आरती केली जाते. हा उत्सव पंधरा दिवस चालतो. शुध्दू अष्टजमीस काळ भैरव जयंती होते. एकवीस वडयाची माळ घालून विधीवत पुजा केल्या जाते. व शुध्द नवमीस शाकंभर नवरात्राची सांगता होते. ह्या दिवसी दुध घोटून त्या चा नैवेध दाखवीला जातो व प्रसाद वितरीत केला जातो.