मंदिराचे वार्षिक कार्यक्रम



         चैत्र शुक्लष प्रतिपदेला येणारा नव वर्षाचा सण व वर्षारंभिचा पूण्य प्रद मुहूर्त गुढी पाडवा मोठया उत्सागहात व निस्सिम श्रध्देणने रेणुका दरबारी साजरा होतो. ही गुढी गडावरील रेणुकेच्याह मुख्यश निशाणा जवळ उभारली जाते. एकात वेळूच्या लांब काठीच्या शिरोभागी नवीनवस्त्रष, पातळ लाऊन त्यारवर उबडा तांब्यामचा कलश ठेवला जातो. त्याय गुढीला खोबरे-खारीक यांची माळ व अंब्यानच्याव पानाने सजविले जाते व नंतर त्या गुढीची विधीवत पुजा अर्चना होते नंतर रेणुकेस पंचामृतादिनी स्नानन घालून हळद-कुंकू भाळी लाऊन महावस्त्री बनरसी पैठणी देवीस नेसवीली जाते व संपूर्ण श्रृंगार करून पुरण पोळीचा नैवेद्या दाखविला जातो व नंतर मुखात पानाचा विडा भरविल्या जातो आणि मग धुप-दिप दाखवून महाआरती केल्या जाते नंतर गुढीला सुध्दा पानाचा चा नैवेध दाखविला जातो. गुढी पाडव्याच्या शुभ पर्वावर पानाचा हा मुख्य प्रसाद मानला जातो.

         त्या प्रसादाचे सेवन पवित्र आणि आरोग्यव वर्धक आहे. चनादाल, गुह, कडुलिंबाची कोवळी पाने, कांदा, हींग, यांच्याय मिश्रणास पनर असे म्हणतात. हा पनर चा प्रसाद गुढील अर्पण केल्या नंतर त्या, गुढीची महाआरती केल्याम जाते व गडावरील संपूर्ण देवी- देवतांना नैवेध दाखवून विधीवत पुजा केली जाते. सुर्यास्तापूर्वी गुढी उतरवून त्या वरील वस्त्रण व मंगल कलश काढून फक्त ती वेळूची काठी व अंब्याची पाने तशीच बारशी म्ह‍णजे 12 दिवसा पर्यत ठेवली जाते. व बारशी एकादशीस पनर चा नैवेध दाखऊन हृया पर्वाची सांगत होते. नववर्ष आणि पावन मुहूर्त असल्यासने हृया मंगलवार पर्वात सहभागी होऊन व देवीच्या् दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या इच्छित कार्याचा प्रारंभ हा सफलदायी होतो व तसा अनेक भावीकांना अनुभव ही आलेला आहे.

         श्रावण शुध्द पंचमीस म्हहणजे नागपंचमीस देवीची संपूर्ण विधीवत पुजा-अर्चना करून. परशुराम मंदिरा जवळील नागमंदिरात जाऊन यथासांग विधिवत पुजा केली जाते. लाहृया-फुटाने, तांब्याचे पाच नाग व सुताचे पवते देवीस अर्पण केल्या जातात. नंतर परशुराम मंदिरा जवळील नागमंदीरात जाऊन मातृकेची नागदेवता निर्माण करून त्याच नागदेवतेची पंचामृताने स्नान घालून अभिषेक केल्या जातो व तांब्याच्या धातूचे पाच नाग अर्पण करून पुरण पोळीचा नैवेध दाखविल्याल जातो. हया दिवशी गडावर लाह्या-फुटण्यापचा प्रसाद वितरीत केल्या जातो व शेवटी महाआरती केल्या जाते.

         श्रावण शुध्दु त्रयो‍दशीस सकाळीच रेणुकेची पंचामृता ने स्नान घालून विधीवत संपूर्ण पुजा केली जाते. ह्या दिवशी देवीस संपूर्ण अलंकार चढविल्या जाते. पीवळा पितांबर नेसविल्या जातो. भाळी मळवट भरून शृंगारीत केल्या जाते व पुरण पोळीचा नैवेध दाखऊन मुखी तांबुल भराविला जातो व सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिल्या जातो. श्रावण समाप्तमीस ‘परंजण’ असे म्हणतात. ह्या दिवशीही संपूर्ण अलंकार चढवून पुजा अर्चना केल्या जाते. विशेष म्ह्णजे ह्या संपूर्ण श्रावण मासा मध्येप देवीचे वंशपरंपरागत सेवा करणारे मुख्य पुजारी अनुष्ठा’न करतात व ह्या कालावधीत सप्तशशतीचे पठन नियमित चालू असते.

         पोळा ह्या सणास माहूरगडावर अनन्य साधारण महत्व आहे. श्रीक्षेत्र माहूरचा पोळा आगळे-वेगळे धर्मिक वेशिष्टय जोपासणारा आहे. ह्या दिवशी सकाळीच देवीचे मुख्य पुजारी मराठा भोपी हे देविची नित्य नियमा प्रमाणे विधीवत पुजा अर्चना करतात. संपूर्ण पुजा विधी झाल्यान नंतर देवीचा मानाचा बैल जगमाता ह्या पवित्र स्थाळी आणला जातो व त्याच ठिकणी रेणुका देवीचे निशाण सजविल्या् जाते व त्या मानाच्या बैलास तेथे शृंगार चढविल्या जातो. एका उमद्या घोडयावर रेणुका देवीचे मुख्य् पुजारी मराठा भोपी हे देवीचे पवित्र निशाण घेऊन बसतात तर मानाचा पवित्र बैल दुसरे एक मराठाभोपी घेऊन, असा ऐश्वर्य संपन्न लावाजमा घेऊन वाजत-गाजत ज्या ठिकाणी पोळा भरतो त्या नगराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रवेश करतात. देवीचा हा मानाचा बैल अम्रपानाच्या तोरणा खाली येताच पोळा फुटतो व तदनंतर.

         नगरात प्रथमच देवचे निशाण, मानाचा बैल आलेला असतो हा मानाचा बैल निशाणासह संपूर्ण नगरभ्रमण करतो. हा वेळेस संपूर्ण गांवकरी ह्या देवीच्या पवित्र बैलाची मनोभावे पुजा करतात. नंतर ह्या पवित्र बैलासह निशाण नगर भ्रमण झाल्या नंतर रेणुका देवी गडावर जातात. देवीच्या मंदिरा समोरील सभामंडपा मध्ये हा मानाचा बैल प्रवेश करतो. तेथे देवीस पुरण पोळीचा नैवेध दाखवून आरती केल्या जाते व देवीच्या बैलास ही पुरण पोळीचा नैवेध दाखवून आरती होते. ह्या विधी समाप्तीय नंतर उपस्थित भक्तांना महाप्रसाद दिल्यार जातो. असा ऐश्व‍र्य संपन्न पोळा हा सण लोकप्रिय आहे. देवदेवेश्वर संस्थानका चा मानाचा बैल आल्यावर पोळा भरतो तर रेणुकादेवी संस्थाकनचा बैल तोरणाखाली आल्यारवर पोळा फुटतो. असा धार्मिक नेत्रदिपक सो‍हळा पाहण्याचसाठी परिसरातूनही मोठया प्रमाणात भाविक माहूर नगरात येत असतात.

         अश्विन शुक्ल पक्ष म्हतणजेच कोजागरी पौर्णिमा गडावर मोठया उत्साहात साजरी होते. त्यात दिवशी देवीची संपूर्ण पुजा केली जाते व रात्रीला भजन, किर्तन आयोजित केल्या जाते. पंचखाद्य टाकून दुध घोटलेला प्रसाद पूर्ण चंद्र पाहून हा नैवेध देवीस दा‍खविला जातो व महाआरती केल्याय जाते आणि उपस्थित सर्व भाविकास हा मधुर प्रसाद वितरीत केल्या जातो.

         श्रावण शुध्‍द त्रयोदशीस सकाळीच रेणुकेची पंचामृतादीने स्‍नान घालून विधीवत संपूर्ण पुजा केली जाते. हया दिवशी संपूर्ण अलंकार चढविल्‍या जातात. पीवळा पितांबर नेसविल्‍या जातो. भाळी मळवट भरुन शृंगारीत केल्‍या जाते व पुरण-पोळीचा नैवैद्य दाखऊन, मुखी तांबुल भरविला जातो व सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिल्‍या जातो. श्रावण समाप्‍तीस ‘ परंजण ’ असे म्‍हणतात. विशेष म्‍हणजे हया संपूर्ण श्रावणमासा मध्‍ये देवीचे वंशपरंपरागत सेवा करणारे मुख्‍य पुजारी अनुष्‍ठान करतात व हया कलावधीत सप्‍तशतीचे पठन नियमीत चालू असते.

         देवी महात्‍म्‍यात नवरात्राचे अनन्‍य साधारण महत्‍व आहे. हा नवरात्र उत्‍सव म्‍हणजेच आदीशक्‍तीच्‍या पराक्रमाचा – शौर्याचा, रणसंघराचा पवित्र काळ, सतत नऊ दिवस रणचंडीकेने दृष्‍ट राक्षसां सोबत घणघोर युध्‍द करुन, आपला पराक्रम दाखविला तो हा कालखंड, महिषासुर हया राक्षसा सोबत सतत नऊ दिवस युध्‍द करुन. त्‍याचा वध केला. तो हा कालखंड अश्विन शुध्‍द प्रतिपदेपासून देवीने हा पराक्रम करुन विजया दशमीस विजय संपादन करुन आई सिंहासनावर विराजमान झाली असा हा कालखंड हयाच कालखंडास शारदीय नवरात्र असेही म्‍हणतात. शारदीय नवरात्रोत्‍सव रेणुकेच्‍या गडावर अतिशय शुचिर्भुत वातावरणात, निस्सिम श्रध्‍देने साजरा केला जातो.

         अश्विन शुध्‍द प्रतिपदेला घटस्‍थापने ने हया मंगल पर्वास सुरवात होते. विधीवत पुजा-अर्चना करुन हया मंगल दिनी एका दगडाच्‍या कुंडा मध्‍ये मातृका भरुन त्‍यावर विवीध पाच प्रकारचे धान्‍य टाकल्‍या जाते. त्‍या कुंडावर मातीचाच कलश देऊन नागवेलीचे पान व श्रीफळ ठेवल्‍या जाते व त्‍या कुंडाच्‍या बाजूला पाच ऊस उभारुन पूष्‍पहार अर्पण केल्‍या जाते व प्रतिपदे पासून नवमी पर्यंत तेलाचे व तुपाचे अखंड नंदादीप तेवत ठेवल्‍या जाते. त्‍याच प्रमाणे प्रतिपदेस घटस्‍थापने पासून ते दस-या पर्यंत पायस म्‍हणजे दहीभात, पुरण-पोळीचा नैवेद्य नियमीत दाखविला जातो. घटस्‍थापने पासून चार दिवस पर्यंत गडावर रेणुका मंदीरा मध्‍ये संपूर्ण, विधीवत, यथासांग पुजा विधी नियमीत केल्‍या जातात.

         नवरात्रातील पंचमीस देवीचे मुखकमल अत्‍यंत आकर्षक आणि चित्‍तवेधक असते. हया दिवशी देवीची अलंकार पुजा केली जाते. महापुजा व महाआरती केल्‍या जाते व सर्व भावि‍क भक्‍तांना महाप्रसादाचा लाभ दिल्‍या जातो व सुर्यास्‍तापूर्वी देवीचे अलंकार उतरुन महाआरती केल्‍या जाते. नवरात्रातील सप्‍तमीस जवळील महाकालीच्‍या गडावर जाऊन महाकालीची यथासांग पुजा केली जाते व महाकालीस महावस्‍त्र अर्पंण केल्‍या जाते.

         आष्‍टमीस पहाटे विधीवत देवीची सर्व पुजा विधी झाल्‍या नंतर गुप्‍त अजाबळी दिला जातो व नंतर यज्ञास सुरवात होते. सप्‍तशतीचे पारायण केल्‍या जाते. होमा मध्‍ये समिधा टाकल्‍या जातात. दहीभात, धान्‍य, पाचवृक्षाची लाकडे, अदी होमा मध्‍ये अर्पण केल्‍या जातात. या पूर्वी नवग्रहाची पुजा केली जाते. सर्वच देव देवतांना अवाहन करुन यज्ञास सुरवात होते.

         नवमीस दिवसभर अष्‍टमी प्रमाणेच पुजा विधी केली जाते. नवमीचा यज्ञ होऊन नवार्ण मंत्राचा जप केल्‍या जातो व जप करुन यज्ञात पुरण-पोळीची आहुती दिली जाते व अजाबळी यज्ञ कुंडात दिला जातो नंतर महाआरती पुजा होऊन नवमी यज्ञाची सांगता होते.

         नवरात्रीच्‍या पूण्‍य काळात देवीच्‍या विविध रुपाच्‍या दर्शनाचा लाभ भाविकास होतो. हया काळा मध्‍ये रेणुकेच्‍या मुखकमलाचे दर्शन घेतांना विविध नऊ रुपे पहावयास मिळतात.

         दिपावलीस संपूर्ण दिप तेववून रेणूकेचे मंदीर प्रकाशमय केल्या जाते. संपूर्ण भक्ती ने पुजा अर्चने नंतर मंदिराच्या सभा मंडपात लक्ष्मी पुजन केल्या् जाते.

         ह्या शाकंभरी नवरात्राचे महत्व असे आहे की, जेव्हा भूतलावर महाभयंकर दुष्काळ पडला. पाण्या शिवाय जीव मात्रांना जगणे अशक्या झाले. तेव्हात ऋषी-मुनी-देव तपस्वी व भक्तांनी देवीची अराधना केली. तेव्हा प्रसन्नल होऊन देवी ने तिच्या शरीरा पासून वनस्पती म्हेणजे शाक निर्माण केली. ही वनस्प्ती विश्वातील जीवजंतूना दुष्काळा त अन्न म्ह्णून पुरवून त्यांना जगवीले. देवीने उत्प्न्‍न केलेल्या संजीवनी शाक वनस्पंतीमुळे जीवरक्षा झाल्या ने देवीस शाकंभरी म्हणून ओळखू लागले. असा शाकंभरी नवरात्रोत्स व दुर्गाष्टमी ह्या दिवशी प्रारंभ होतो. नित्य नियमाने संपूर्ण पुजा अर्चना झाल्या नंतर दही भाताचा नैवेध व पुरण पोळीचा नैवेध दाखवून आरती केली जाते. हा उत्सव पंधरा दिवस चालतो. शुध्दू अष्टजमीस काळ भैरव जयंती होते. एकवीस वडयाची माळ घालून विधीवत पुजा केल्या जाते. व शुध्द नवमीस शाकंभर नवरात्राची सांगता होते. ह्या दिवसी दुध घोटून त्या चा नैवेध दाखवीला जातो व प्रसाद वितरीत केला जातो.

         मार्गशिष चंपाष्टीषला गडावर खंडोबाचे पुजन केल्या जाते. बाज-याची भाकर, वांग्या चे भरीत व पातीचा कांदा असा नैवेध ह्या दिवशी खंडोबास भरविला जातो.

         पौष शुक्लं म्हणजे मकर संक्रांत ह्या दिवशी तिळ गुळाचा नैवेध दाखविला जातो.

         संपूर्ण पुजा विधी झाल्या नंतर गडाच्या उत्तरेस होलीका पुजन केले जाते. तेव्हां त्यार देवीस पातळ,खण, नारळ, बांगडया पुष्प हार अर्पण करून पुजा केली जाते व होळी पेटवीली जाते. नंतर मातृतिर्थ, वनदेवी , आणी विष्णुयकवी मठ येथे ही होळी पेटविली जाते. यासह विविध सण व उत्सव मोठया उत्साहाने साजरे केले जातात. ह्या शिवाय प्रत्ये्क दिवशी गडावरील वंशपरंपरागत मुख्य पुजारी देवीची विधी करणारे मराठाभोपी हे नित्ये नियमाने तेथे कार्यरत आहेत. प्रत्येक दिवशी भल्याल पहाटे रेणुकेच्याठ मुखकमलावर शेंदुर लावल्यात जातो व पंचामृतादिने स्नान घालून हळद कुंकू माळी लावल्या जाते. मंत्र पठण व सप्ताशतीचे पाठ केल्या जातात. नंतर महावस्त्रव अर्पण करून पुरण पोळीचा नैवेध अर्पण केल्या जातो व मुखी तांबुल भरवील्या जातो. महाआरती केल्याच नंतर गडावरील सर्वच देच देवतांची पुजा केली जाते. नित्य नियमाने संपूर्ण देवस्थानची व्यवस्थ पाहणारे व पुजा विधी करणारे मराठाभोपी हे येणा-या भक्तांणची सेवाही मोठया श्रद्धेने करतात ह्या मराठाभोपी पुजा-यांचा पेहरावा भाळी मळवट, गळया मध्ये रूद्राक्ष आणि कवडयांच्या माळा व अंगावर भगवे उपरणे असे असते.

         वरील सर्व सण उत्सळवाचे अवलोकन केल्यास आपणास सहज लक्षात येते की, ही देवी सर्व सामान्यांची अराध्य देवता आहे. आर्य भारतात येण्यापूर्वी भारत वर्षा मध्येस सिंधू संस्कृती ही प्रसिध्द व प्रगत होती हे आपणास ज्ञात आहे. ह्या सिंधु संस्कृ्ती मध्ये राहणा-या प्रत्येकांची अशी धारणा व विश्वास होता की, आपली उत्पत्ती आई-वडीला पासून झाली असल्याने ह्या जगाची उत्पती ती आई-वडीलां पासून झालेली आहे. विश्वा्चे कोणी आई-बाप असले पाहीजे असे समजून हीच वडीलांची व आईचे प्रतिके अनुक्रमे शिवाचे लींग व जगन्माता होय. ह्या विश्लेीषणा वरून लिंगपुजा व देवीची उपासना आर्याच्यां आधीही सिंधु संस्कृहतीत चालत आलेली आहे व रेणुकेस मातंगी हे ही नाव आहे. विष्णुहरूपी परशुरामाची माता, शिवरूपी जमदन्गींची कांता ही रेणुका असल्या मुळे श्री रेणुका शाक्त‍ व वैष्णव ह्या दोन्ही पंथांना पुजनीय आहे.